🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. लोकेश राहुल (KL Rahul) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय डावाची सुरुवात करतील. याआधी सोमवारी सामन्याचा दुसरा दिवस पावसामुळे वाहून गेला. आज भारत कोणत्या प्लॅनिंगसह उतरणार आहे हे जाणून घेऊया.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 292 धावा केल्या आहेत. लोकेश राहुलने शानदार शतक झळकावले, तर फॉर्मबाबत प्रश्नांनी घेरलेल्या रहाणेने शानदार फलंदाजी केली. राहुल १२२ आणि अजिंक्य ४० धावांवर नाबाद आहेत. भारतासाठी पहिला दिवस उत्कृष्ट ठरला, मात्र दुसऱ्या दिवसाच्या पावसाने विराट कोहली आणि संघाची चिंता वाढवली. आता टीम इंडियाला आपली रणनीती बदलावी लागणार आहे.
आज अजिंक्य रहाणे आणि केएल राहुल क्रीझवर आल्यावर त्यांचे पहिले काम असेल सुरुवातीच्या षटकांमध्ये स्वतःला सांभाळणे. दोन्ही संघांसाठी आज सुरुवातीची षटके महत्त्वपूर्ण असणार आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज विकेट्स घेऊन स्वतःला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न करतील.
Car conversations with 'Centurion' @klrahul11 ???? ????️
From emotions on scoring ton ???? to forming partnerships ???????? & batting mindset ????.
The #TeamIndia opener discusses it all after Day 1 of the 1st #SAvIND Test. ???? – By @28anand
Full interview ???? ????https://t.co/d2DooNWtrG pic.twitter.com/Y0ONWu5vQ3
— BCCI (@BCCI) December 27, 2021
सेंच्युरियन येथे भारताने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली. भारताकडून फलंदाजीसाठी आलेल्या केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. भारताने पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. मयंक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक केले. मयंक 60 धावा करून एनगिडीचा बळी ठरला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आला आणि खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार विराट कोहलीसोबत खेळताना केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने शतकही केले. विराट कोहलीच्या रूपाने भारताने तिसरी विकेट गमावली. कर्णधार विराट कोहली 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
महत्त्वाच्या बातम्या
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
- दक्षिण आफ्रिकेतील वनडे कर्णधारपदी केएल राहुलची होणार निवड?
- …तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी- भास्कर जाधव
- ‘मविआ’ने अल्टीमेटम देताच राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बंद लिफाफ्यात पत्र
- “केएल राहुल सध्या जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू फलंदाज”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

