Share

शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार, पशूधनाचा छळ होऊ नये- मुख्यमंत्री ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली ग्रामीण भागातील लोकप्रिय बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज हे कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करावे यासाठी बैलगाडा प्रेमींचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले आहेत की,’बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाचा जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले,’अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आपली संस्कृती, परंपरा टिकवणाऱ्या या शर्यतींसाठी चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही त्यांनी अभिनंदन केले. शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार, पशूधनाचा छळ होऊ नये. त्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे,’असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!