पुणे : राज्यात कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव कोणत्या शहरात असेल तर ते म्हणजे पुणे शहर. पुणे शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण अढळून आले होते. त्याच बरोबर मृत्यूची संख्याही सर्वाधिक होती. हीच रुग्णवाढ आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी महपौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेने जीवाचं रान करत शहरासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नन केले.
कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांना पुणेरांनीही भक्कम साथ दिली. आज समस्त पुणेकरांच्या साथीला आणि महापाालिकेच्या प्रयत्नांना यश आलंय. 6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच पुण्यात काल कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. असं असलं तरी महापौरांनी याचं सर्व श्रेय पुणेकरांना दिलंय. त्यांनी श्रेयासाठी कोणताही हक्क सांगितलेला नाही.
पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही !
पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2021
पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झालेली नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. काल (बुधवार) तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमचं पुण्यात कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नाही. पुण्याच्या महापौरांनी यासंदर्भात ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.
‘पुणे महापालिकेने उभी केलेली आरोग्य, व्यापक पातळीवर केलेले लसीकरण आणि सण-उत्सवाच्या काळात पुणेकरांनी दिलेली साथ, यामुळे शहरातील कोरोना संसर्गस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शिवाय ६ फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर येणे हा मोठा दिलासा असून पुणेकरांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे’, असं म्हणत रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या रोखल्याचं संपूर्ण श्रेय मोहोळ यांनी पुणेकरांना दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’; ईडी कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- ‘कॅ.अमरिंदर यांच्या अपमानाच्या भांगड्यात भाजपचे ढोलवादक होते हे स्पष्ट झाले’
- ‘कॅ.अमरिंदर यांना ‘चावी’ मारून भाजपात प्राण फुंकण्याचे राजकारण त्यांच्यावरच उलटेल’, संजय राऊतांचा इशारा
- आमच्यासोबत शिवसेना सोडायला रामदास कदम पहिल्या नंबरला होते; निलेश राणेंचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

