दिल्ली : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत टॉप-१० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, पुणे जिल्ह्याचा क्रमांक यात अव्वल आहे.
‘पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगलुरू अर्बन, नांदेड, जळगाव आणि अकोला या दहा जिल्ह्यांमध्ये सद्या सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असून यातील बेंगळुरू हे शहर कर्नाटकातील तर इतर सर्व जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. तर, केंद्राने महाराष्ट्रात दुसरी लाट आल्याचा इशारा याआधीच दिला आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
The top 10 districts where maximum active cases are concentrated are – Pune, Nagpur, Mumbai, Thane, Nashik, Aurangabad, Bengaluru Urban, Nanded, Jalgaon and Akola. Nine districts from Maharashtra and one fro, Karnataka: Union Health Secretary Rajesh Bhushan#COVID19 pic.twitter.com/xWneLDYb4I
— ANI (@ANI) March 24, 2021
राज्य सरकारची महत्वपूर्ण बैठक !
राज्य सरकारची कॅबिनेट बैठक सद्या सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जात आहे. तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिक रुग्ण सापडणाऱ्या शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाईल इशारा यादीच दिला आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्र्यांना बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल?’
- ‘नितीन राऊतांनी पवारांच्या घरावर मोर्चा काढण्यापेक्षा स्वतःला अध्यक्षपद हवं असेल तर तसं सांगावं !’
- पक्षाने आदेश दिल्यास मी पंढरपूरमधून पोटनिवडणूक निश्चितपणे लढवीन – राम शिंदे
- ‘या’ कारणासाठी उस्मानाबाद पालिकेने पटकावला राज्यात पहिला क्रमांक
- टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण ; ‘हा’ खेळाडू इतक्या दिवस राहू शकतो क्रिकेटपासून दूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

