पुणे : पुणे येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली.
बॉल अडवण्यासाठी अय्यरने उडी मारली, त्यावेळी तो डाव्या खांद्यावर पडला, यानंतर अय्यरला खूप त्रास झाला. लगेचच टीम इंडियाचे फिजियो नितीन पटेल मैदानात आले. दुखापत गंभीर असल्याचं लक्षात येताच त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. अय्यरच्याऐवजी शुभमन गिलला फिल्डिंगला बोलावण्यात आलं.
श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असेल तर त्याला वनडे सीरिजमधूनही बाहेर राहावं लागू शकतं. बीसीसीआयकडून (BCCI) मात्र याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेलं नाही. श्रेयस अय्यरला जर उरलेल्या दोन मॅचमध्ये खेळता आलं नाही, तर सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.
सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर भारताला उपयोगी ठरू शकतो. टी-20 सीरिजमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपल्या पहिल्याच टी-20 इनिंगमध्ये सूर्यकुमारने 28 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला


