Share

पंचनामे होतच राहतील, अगोदर शेतकऱ्यांना मदत करा- देवेंद्र फडणवीस

Published On: 

नागपूर: अतिवृष्टीमुळे जेव्हा नुकसान होते तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. त्यामुळे पंचनामे होतच राहतील. अगोदर शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

तर राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकारच्या भूमिकेवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. राज्य सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झालेली नाही. या घोषणा केवळ कागदावर राहिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत हे वास्तव आहे. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी आज शेतकरी असो किंवा समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!