🕒 1 min read
वाराणसी – उत्तर प्रदेशमधील करोना हाताळणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले. उत्तर प्रदेश सरकारने करोनाची दुसरी लाट अभूतपूर्व पद्धतीने नियंत्रणात आणली, असे पंतप्रधान म्हणाले.वाराणसीतील आयआयटी- बीएचयू मैदानावर गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी १५०० कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचा शिलान्यास केला. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दलही पंतप्रधानांनी राज्य सरकारची प्रशंसा केली. उत्तर प्रदेशात आज कायद्याचे राज्य आहे. एकेकाळी नियंत्रणाबाहेर असलेल्या माफियाराज आणि गुंडगिरीवर आता कायद्याचा वचक आहे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश हे उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचं एक महत्त्वाचं राज्य बनलं आहे असं देखील प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी काल केलं.
मोदींनी योगींचे कौतुक केल्यानंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून योगींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
मोदी जी के सर्टिफिकेट से यूपी में कोरोना की दूसरी लहर के दौरान योगी सरकार की आक्रामक क्रूरता, लापरवाही और अव्यवस्था की सच्चाई छिप नहीं सकती।
लोगों ने अपार पीड़ा, बेबसी का सामना अकेले किया। इस सच्चाई को मोदीजी, योगीजी भूल सकते हैं, जिन्होंने कोरोना का दर्द सहा, वे नहीं भूलेंगे
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 16, 2021
त्या म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून करोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचं क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. आपल्या ट्विटमध्ये त्या पुढे म्हणतात, लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी हे सत्य विसरू शकतात. पण ज्यांनी करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे ते कधीच विसरू शकणार नाही असे प्रियांका यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- पंजाब नॅशनल बँककडून नोकर धारकांना मिळणार 3 लाखांचा लाभ
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
