🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या समतोल वापरातून २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली आहे. मोदींच्या या घोषणेचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वागत केले आहे. ग्लासगो येथील जागतिक परिषदेत सोमवारी पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका मांडताना ही घोषणा केली असून भारताकडून तसं पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलं आहे.
भारताने २०३० पर्यंत आपली इंधनाची निम्मी गरज अपारंपरिक ऊर्जेतून भागविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यातून कार्बनचे उत्सर्जन कित्येक अब्ज टनांनी कमी होणार आहे. जगभरात हवामान बदल रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यामुळे मोठी मदत होणार आहे, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हंटल आहे.
PM @narendramodi has for the first time made a commitment for India to become net zero, meaning 90% of the world’s economy is now committed to this goal. 2/3
— Boris Johnson (@BorisJohnson) November 1, 2021
India has today announced ambitious plans for half its energy to come from renewables by 2030.
This will cut carbon emissions by a billion tonnes, contributing to a worldwide decade of delivery on climate change. 1/3
— Boris Johnson (@BorisJohnson) November 1, 2021
Met PM @BorisJohnson on the sidelines of the @COP26 Summit in Glasgow. We got the opportunity to talk about different subjects including mitigating climate change. pic.twitter.com/xm8xqGwqwR
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2021
२०३० पर्यंत भारताची इंधनाची निम्मी गरज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून भागविली जाईल, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्याची पंचसूत्री मोदी यांनी ग्लासगो परिषदेत मांडली. त्यात २०३० पर्यंत भारताची जिवाश्मरहित इंधननिर्मितीची क्षमता ५०० गिगावॉटपर्यंत वाढविण्याचे सूतोवाच केले आहे. या कालावधीपर्यंत भारतात अपेक्षित असलेल्या कार्बन उत्सर्जनात एक अब्ज टनांची घट करण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात
- ‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’
- दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान; मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
