मुंबई : मागील काही दिवस राज्याचे कौशल्य विकास मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. तर, कोरोनाच्या दुसरी लाटेतील रुग्णसंख्या, भ्रष्टाचार, अपुरी आरोग्य व्यवस्था, ढिसाळ नियोजन, अपुरी मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा तीन तासांचा कोकण दौरा अशा मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर भाजपने हल्लाबोल केला आहे.
नवाब मलिक देखील भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार यांना देखील लक्ष्य केलं आहे. दरम्यान, आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
"असून खोळंबा,नसून वळिंबा"
ही म्हण, महाविकास आघाडी सरकारला चपखल बसते.
राज्याच्या हितासाठी ह्यांचा सत्तेत असून किंवा नसून पण काहीच उपयोग नाही!
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत,
उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर विचार करत नाहीत,
अन् कौशल्य विकासमंत्री कामाचं सोडून सर्वकाही बडबडतात…— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 23, 2021
‘ “असून खोळंबा, नसून वळिंबा” ही म्हण, महाविकास आघाडी सरकारला चपखल बसते. राज्याच्या हितासाठी ह्यांचा सत्तेत असून किंवा नसून पण काहीच उपयोग नाही! मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर विचार करत नाहीत, अन् कौशल्य विकासमंत्री कामाचं सोडून सर्वकाही बडबडतात…,’ असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला


