Share

“सरकारला विरोधकांवर कुरघोडी करण्यावाचून…”, प्रवीण दरेकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्टाचा’ या यात्रेची सांगता सभा टेंभुर्णी येथे झाली. सदाभाऊ खोत यांनी २१ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडिंग, जादा ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, वीज बिल माफी,तसेच अतिवृष्टी, वादळ, पूर, दुष्काळ, रासायनिक खतांची टंचाई, खतांचे बोगस दर असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांसमोर ‘आ वासून’ उभे असताना सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे. अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

तसेच सरकारला विरोधकांवर कुरघोडी करण्यावाचून वेळ नसेल, मात्र भाजपा बळीराजाच्या पाठीशी कालही होती आणि पुढेही भक्कमपणे उभी असेल. असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!