🕒 1 min read
पुणे : कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कारवाईची प्रकिया सुरु आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वकीलांनी राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल आहे.
दरम्यान रविवारपासून नितेश राणे हे गायब आहेत. नितेश राणेंच्या गायब असण्यावरुन विरोधकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. ‘नितेश राणे हे अटकेच्या भितीने पळून गेले असावेत असा अंदाज विरोधकांकडून बांधला जात आहे. शिवसेनेने तर कणकवलीत आमदार राणेंना अटक करावी या मागणीसाठी सोमवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.
नितेश राणे देखील गेले तीन दिवस कोठेच दिसत नसल्याने विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी आयती संधी चालून आहे. राष्ट्रवादीचे (NCP) पुणे शहरध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी नितेश राणेंचे नाव घेता एक ट्विट केले आहे. ‘लोकांना वाटत आहे ते दिल्लीला पळून गेले. कसे शक्य आहे? कोंबडीच्या पंखात एवढे बळ नसते, असं म्हणत प्रशांत जगताप यांनी नितेश राणेंना जोरदार टोला लगावला आहे.
लोकांना वाटतंय ते दिल्लीला पळून गेले…
कसं शक्य आहे ?
कोंबडीच्या पंखात एवढं बळ नसतं ????— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 27, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात दरेकरांनी मांडला अविश्वास ठराव
- 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुढील तारीख लवकरच होणार जाहीर
- तुम्हाला ते जमलं नाही निदान नाच्याचं काम तरी नीट करा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार
- नारायण राणेंकडून भास्कर जाधवांना ‘नाचा’ची उपमा
- “आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
