🕒 1 min read
नवी दिल्ली: कोरोनाची लस आली लसीकरण सुरु होऊन देखील दोन महिने उलटून गेले मात्र अद्याप देखील कोरोना आटोक्यात आला नसून राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान या बैठकी आधी महाराष्ट्राला 54 लाख कोरोनाच्या लसी दिल्या. मग आतापर्यंत केवळ 23 लाख लसींचच लसीकरण का करण्यात आलं? असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.
प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून महाराष्ट्र सरकारला कोरोना लसीकरणावरून फटकारले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 23 लाख लस टोचण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 54 लाख लसी देऊनही अत्यंत कमी लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यात केवळ 56 टक्के लसीकरण करण्यात आलं आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं.
Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. 56% vaccines remained unused. Now, Shiv Sena MP asks for more vaccines for the state.
First mismanagement of pandemic now poor administration of vaccines.— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 17, 2021
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे काल दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे लसीच्या अतिरिक्त साठ्याची मागणी केली आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- मद्यधुंद महिलेचा रस्त्यावर धिंगाणा…पोलिसांनी हटकले तर पकडली पोलिसाची कॉलर
- ‘या’ चुकामुळे झाला भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव
- कोरोनाच्या पाश्वभूमीवर ‘ही’ क्रिकेट स्पर्धा स्थगित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
