परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात लॉकडाऊनच्या तसेच संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालावा, या दृष्टीने येथील श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे २११ गरजू कुटूंबियांना ३० दिवस पुरेल एवढे धान्याचे कीट नुकतेच वितरत केले आहे. या माध्यमातून गरिब आणि गरजुंना जेवनाची व्यायनव माध्यमातून लाभ मिळणार आहे.
श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे गेल्या पाच वर्षांपासून सेलू शहरात दरवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन केल्या जात आले आहे, परंतु मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रा रद्द करावी लागली. यावर्षीसुध्दा शोभायात्रा रद्द केली. परंतु, समितीने यावर्षी गरजवंतांसाठी प्रभू श्रीराम अन्नछत्र हा अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला. त्याप्रमाणे श्रीरामनवमीचे औचित्य साधून श्रीराम भक्तांच्या व समितीच्या सहकार्यातून २११ गरजू कुटूंबियांना ३० दिवस पुरेल एवढे धान्य वितरित केले.
उपजिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, वैद्यकीय अधिक्षक यांच्याहस्ते या वेळी धान्यांच्या कीटचे वितरण करण्यात आले. दरम्यान, समितीतर्फे गरजवंत कुटूंबियांना घरपोच धान्य सामुग्री वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी समिती सदस्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? पटोलेंचा सवाल
- ४५ ते ५९ वयोगटातील ६० हजार नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!
- उस्मानाबादेत महावितरणचा ढिसाळ कारभार, मुख्य वाहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडित
- शाळासिद्धि अंतर्गत, शाळांना स्वयंमूल्यमापनाच्या सूचना
- विमानाची प्रवाशी संख्या कोरोनामुळे घटली, नांदेड विमानतळावर शुकशुकाट


