Share

Agnipath Scheme: “शक्तिशाली भारत कधीही नको असलेल्या…”, पी. चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनामुळे देशातील वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. अग्निपथ भरती  योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. आता यावरच काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अग्निपथ’ हे केंद्र सरकारचे धोरणात्मक विधान असून त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हा एक राजकीय प्रश्न आहे जो शांततापूर्ण आंदोलने तसेच चर्चेतून सोडवावा लागेल.”, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.

Agnipath Scheme Explained : काय आहे मोदी सरकारची ‘अग्निपथ योजना’?, का होतोय विरोध! जाणून घ्या…

तसेच शक्तिशाली भारत कधीही नको असलेल्या अंतर्गत आणि बाह्य शक्ती तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे. दरम्यान अग्निपथ योजना हे भारतीय लष्कराच्या ‘टूर ऑफ ड्यूटी एंट्री स्कीम’ला दिलेले एक नवीन नाव आहे. सशस्त्र दलांनी दोन वर्षांपूर्वी टूर ऑफ ड्यूटी योजनेवर चर्चा सुरू केली. या योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या करारावर सैनिकांची भरती केली जाणार आहे. भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षित केले जाईल आणि त्यानंतर त्यांना विविध क्षेत्रात नियुक्त केले जाईल. यामुळे कायमस्वरूपी सैनिकांची भरती करण्याची सध्याची प्रथा संपुष्टात येईल आणि त्यामुळे सैन्य भरती योजनेत मोठा बदल दिसून येईल. सशस्त्र दलांना विशेष कामासाठी तज्ञ तरुणांची नियुक्ती करण्याचा पर्याय देखील असेल. याअंतर्गत लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये भरती होणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!