मुंबई: देशात सध्या अग्निपथ योजनामुळे वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. आता यावरच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अग्नीवीर या योजनेमागे भाजप आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल.”, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
https://www.facebook.com/100044427156565/posts/582590473231853/
दरम्यान देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. याविरोधात बिहारने काल बंद पुकारला होता. बिहारमध्ये आंदोलकांनी १२ रेल्वे जाळल्या असून या योजनेविरोधातील १३ राज्यांत प्रचंड विरोध केला जात आहे. त्यात बिहार आणि तेलंगणध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मेहबूब शेख प्रकरणातील पीडित तरूणीच्या आरोपानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- मेहबूब शेख प्रकरणाला नवे वळण; कथित पीडितेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार
- IND vs SA : आवेश खानने त्याच्या कामगिरीचे श्रेय ‘या’ कारणामुळे दिले राहुल द्रविडला; वाचा!
- IND vs IRE : आयर्लंड दौर्यावर राहुल त्रिपाठीचं भारतीय संघात पदार्पण होणं कठीण, माजी खेळाडू म्हणाला…!
- Monsoon in Maharashtra : 15 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी! मुंबई, कोकणसह कुठे मुसळधार पाऊस पडेल, जाणून घ्या…


