🕒 1 min read
बीड : परळीत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती आज मंगळवारपासून बंद करण्यात आलेली आहे. आर्थिक कारणाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. ६, ७, ८ हे प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे संच आहेत. या तिन्ही संचाची एकूण स्थापित क्षमता ७५० मेगावॅट इतकी आहे. हे संच नेमके किती दिवस बंद राहणार आहेत, याबद्दल अस्पष्टता आहे.
आज सकाळी १२ च्या दरम्यान केंद्रातील संच क्रमांक ६ आणि संच क्रमांक ६ हे बंद करण्यात आले असून क्रमांक ८ हा देखील दुपारपर्यंत बंद केला जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने महाजनकोच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने चालु वीजनिर्मिती बंद केल्याचे सांगितले.
वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळसा या कच्च्या मालावरील खर्च वाढला आहे. वाढलेला उत्पादन खर्च कंपनीच्या आर्थिक धोरणांच्या निकषात बसत नाहीये. त्यामुळे वीज निर्मितीला प्राधान्य देण्याऐवजी कंपनीच्या मेरिट ऑर्डर डिसपॅच (एमओडी) मध्ये बसत नसल्याने वीज निर्मिती करणे परवडत नसल्याचे देण्यात आले आहे. यामुळे वीजनिर्मिती पूर्णत: ठप्प करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील लवकरच जाहिर करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- नोकरदारांसाठी महत्वाची बातमी: EPFO कडून व्याज दराच्या घोषणेची शक्यता
- काका, आपण ‘महाराष्ट्राचं नेतृत्व’ करावं ह्याच सदिच्छा ! तांबेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण
- स्टेजवर वर पुन्हा रंगणार डॉक्टर गुलाटी आणि चप्पूची जुगलबंदी
- ग्रेटाच्या टुलकिट प्रकरणात अडकलेला शंतनू मुळूक आहे तरी कोण?
- अलाहाबाद बँक ग्राहकांसाठी आले मोबाइल बँकिंग अॅप: जाणून घ्या

