🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. मात्र भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने उधळत या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) वक्तव्य केलं आहे.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगातील लोक भारताकडे अधिक मजबूत रूपाने पाहत आहेत. त्यासाठी आपल्या देशाला वेगाने पुढे नेणं आपल्यासाठी गरजेचे आहे. हा काळ नव्या संधी आणि नव्या संकल्पना यांना पुढे घेऊन जाणारा आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, आज भारताची निर्यात ४ लाख ७० हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. कोरोनाच्या या काळातही भारताने आपल्या अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू गरीब आणि तरुणांवर आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
अनिल देशमुखांचा मोठा खुलासा; म्हणाले, “अनिल परब द्यायचे पोलीस बदल्यांची यादी”
-
मोदी सरकार महिला विरोधी असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा सिद्ध झाले; महिला काँग्रेसची टिका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
