नवी-दिल्ली : झारखंड, मणीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय अशा राज्यातील एकूण ४० जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग कमी झाल्यामुळे जी-२० परिषद आणि सीओपी-२६ हवामान परिषद या दौऱ्यावरुन परत आल्यावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत.
आत्तापर्यंत देशात १०६ कोटींपेक्षा अधिक नागरीकांना लस देण्यात आली आहे. परंतु असे असले तरी मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग कमी झाला असून अनेकांनी लसीचा दुसऱ्या डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेक राज्यात शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आल्या असून चित्रपटगृह देखील पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहेत.
दरम्यान, सध्या देशात सर्व व्यवस्था पूर्णपणे खुल्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वेगाने लसीकरण करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

