नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे आता दिल्लीतील सरकारी कार्यालयात लावण्यात येणार आहेत. कोणत्याही राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात येणार नाहीत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, “स्वातंत्र्याच्या ७० वर्षापासून आपले सरकार बाबासाहेब आणि भगतसिंग यांची स्वप्ने पूर्ण करत आहे. या देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, असे बाबासाहेबांचे स्वप्न होते. दिल्ली सरकारने गेल्या सात वर्षांत शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी काम केले आहे. बाबासाहेब आणि भगतसिंग यांनी अशा भारताचे स्वप्न पाहिले होते जिथे सर्वांना समान अधिकार असतील. दिल्ली सरकार या दिशेने ठोस पावले उचलत आहे.”
आपल्या भाषणात अरविंद केजरीवाल म्हणाले की, "स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. गेल्या सात वर्षांपासून दिल्ली सरकारने शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी काम केले. सरकार स्थापन होताच शिक्षणाचे बजेट २५ टक्के करण्यात आले. आता आम्ही आमच्या शाळांमध्ये मुलांना चांगला माणूस आणि कट्टर देशभक्त बनवून व्यवसाय करायला शिकवत आहोत. यातून बाबासाहेब आणि शहीद भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण होत आहे.”
तसेच दिल्ली सरकारच्या कार्यालयांमध्ये यापुढे कोणत्याही नेत्याचे छायाचित्र असणार नाहीत, असे केजरीवाल यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची छायाचित्रे लावली जाणार नाहीत. त्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत. आज जर बाबासाहेब असते तर त्यांनी खूप आशीर्वाद दिला असता, असे केजरीवाल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी युवकांचा पुढाकार महत्त्वाचा; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंचे प्रतिपादन!
- Health Updates: लता मंगेशकर १७ दिवसानंतरही आयसीयूमध्ये, तब्येतीत सुधारणा
- ओबीसी आरक्षणासह आगामी निवडणुका व्हाव्यात, अशी आमची भूमिका-अजित पवार
- संभाजीनगरचा विकास पाहायला लवकरच येणार; संत एकनाथ रंग मंदिर लोकार्पणात मुख्यमंत्र्यांची ग्वाही..!
- बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चनसह सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!


