मुंबई : राज्यमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ वाद सुरु असतांनाच कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी याच प्रकरणावरुन सोमय्या यांना सोमवारी आयोजित केलेला कोल्हापूर दौरा रद्द करावा लागला. तसेच त्यानंतर राजकीय चर्चेला आणि चढाओढला सुरुवात झाली. परंतु आता या वादांमध्ये शिवसेनेनेही आपली बाजू मांडत भाजपावर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे.
‘सामना’तून टीका करत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की,’महाराष्ट्रातील भाजपाचे लोक संसदीय लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहेत’. तसेच ‘राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवून थेट दिल्लीच्या कानात बोटे घालीत आहेत. राज्यपालांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत प्रत्येक जण महाराष्ट्र सरकारला शत्रू मानून वागत आहे. राज्य खिळखिळे करायचे, राज्याची गती रोखायची, बेबंद आरोप करून खळबळ माजवायची हेच त्यांचे धोरण आहे. एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही’. तसेच त्यांच्या मुखातून भाजपाची लक्तरेच लोंबत असतात. एकतर ते ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या संस्थांना बदनाम करीत आहेत. या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल असे त्यांचे वर्तन आहे. दुसरे एक गंभीर विधान पाटलांनी केले. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही. पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची ‘पीएच.डी.’ त्यांनी केली असावी. त्यामुळे ‘ईडी’ने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा व आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडास फेस आणायला हवा. स्वतः फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे प्रशासन त्यांना माहीत आहे. ज्या प्रशासनाकडून त्यांनी कारभार केला तेच प्रशासन आजही आहे. पुन्हा प्रशासनातले अधिकारी विरोधी पक्षनेत्यांना गोपनीय रीतीने भेटत असतात हा स्फोट त्यांनीच केला आहे. मग ऊठसूट ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या धमक्या का देता? केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय?’, असा प्रश्नही लेखातून करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’
- ‘महिला आयोगाला अध्यक्ष देऊ शकत नाही, तुम्ही काय आमचं नेतृत्व करणार?’
- हिरवे लाडू खाणारे सरकार हिंदूंवर गुन्हा दाखल करते, तर महेबूब शेखला वाऱ्यावर सोडते, मनसेला हल्ला
- महाराष्ट्र पुन्हा हादरला! अमरावतीमधील गर्भवती अत्याचार पीडितेची गळफास घेत आत्महत्या
- राज्यसरकार महिला सुरक्षा विषयात अपयशी, राज्याची परिस्थिती चिंताजनक – अभाविप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
