Share

‘जनतेला कळून चुकलंय, मोदींच्या काळातच देश अंधाराकडे चाललाय’

Published On: 

मुंबई : भाजपला लागलेली गळती थांबली असून महाविकास आघाडीमधील संपर्कात असलेले आमदार येत्या काळात भाजपमध्ये येणार असल्याचे सूचक विधान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी केलं आहे. यासोबतच या देशाचं भविष्य गांधी नाही तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत असा खोचक टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

‘भाजपमध्ये जे बाहेरून नेते आले आहेत, त्यांनी मोठे राजकारण पाहिले आहे. त्यांना चांगले समजते की, या देशाचे भवितव्य हे राहुल गांधी, सोनिया गांधी वा यूपीए सरकार सुद्धा नाही. देशाचे भवितव्य फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत’ असं भाष्य फडणवीसांनी केलं आहे.

त्यांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस जे भविष्य बोलत आहेत, त्याची वर्तमानातून वाटचाल काय असणार ते पूर्णपण देशाच्या जनतेला कळून चुकलंय. देश अंधार यात्रेत चालला आहे. यासोबतच लोकशाही संपुष्टात आणण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे याचा विरोध करायचा असेल तर फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व उभे राहील. हे जनतेला माहित आहे.’ असं टीकास्त्र सचिन सावंत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!