मोर्शी:- राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून मोर्शी विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे. त्यामुळे आता गावोगावी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती गावातील पुढाऱ्यांना आपल्या गावात विकास व्हावा असे वाटत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, यापूर्वी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी २५ लाखांचे बक्षिस पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धी या गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असून, इतरही गावे बिनविरोध करण्याचा निर्णय लंके यांनी घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मालमत्ता खरेदीदारांना खुशखबर ! मुद्रांक शुल्कामधील सवलत चार महिन्यांनी वाढली…
- भारतात मुस्लिमांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा- साक्षी महाराज
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- ‘नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते’
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

