🕒 1 min read
रायगड : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्याबाबत विचारविनिमय सुरु असतानाच दुसरीकडे कोकणासह कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये कोरोना बहितांची संख्या ही चिंताजनक आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासोबतच विकास कामांचा देखील आढावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची कोकणाप्रती असलेल्या आत्मीयतेच्या देखील आवर्जून उल्लेख केला आहे.
‘कोकणची ही भूमी ऐतिहासिक आहे. या भूमीला छत्रपतींचा वारसा आहे, महाडचं चवदार तळंही इथेच आहे. सी डी देशमुख, कान्होजी आंग्रेंचा इतिहास. त्यामुळे इथे आल्याचा आनंद आहे, रायगडावर सुवर्णतुला 4 जूनला झाली, आजचा दिवस महत्वाचा आहे, ‘असं अजित पवार म्हणाले.
‘शरद पवारांनी अनेक हल्ले , वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं. कोकणाबद्दल पवार साहेबाना प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी त्यांची इच्छा आहे. राज्य सरकारने निधी देण्याचं काम केलं. मुंबई गोवा महामार्गावर फॉरेस्टची अडचण आहे. काम रखडलंय, आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करतोय, लवकरच काम होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात साताऱ्यात एकाच दिवशी 40 किलोमिटरचा रस्ता तयार केला,’ असं अजित पवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसनेच अण्णासाहेब पाटील यांची हत्या केली’, आ.मेटेंचा खळबळजनक आरोप
- आरक्षणावरून संभाजीराजेंनंतर भाजपचे आणखी एक खासदार आक्रमक
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘काँग्रेसचे मंत्री लाचार झालेत, ते काका-पुतण्यांसमोर माना डोलावतात’
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
