Share

रेल्वेकडे प्रवाशांची पाठ; अनलॉकमध्येही आजपासून ‘या’ रेल्वे रद्द!

Published On: 

औरंगाबाद : रेल्वेला कमी प्रवाशी संख्या असल्याने काही रेल्वे गाड्या सोमवार (दि.७) पासून रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. आजपासून औरंगाबाद शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरु होत आहे. औरंगाबाद विभागातून ८० हून अधिक रेल्वे धावत आहेत. मात्र सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतरही काही रेल्वे प्रवाशांअभावी आजपासून रद्द होत आहे. प्रवाशांना पॅसेंजर रेल्वे सुरु होण्याची प्रतिक्षा कायम आहे.

रेल्वे विभागाच्या वतीने औरंगाबाद-नांदेड ही रेल्वे ७ जून ते १४ जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच नांदेड – औरंगाबाद ही रेल्वे ४ जून ते ११ जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच आदिलाबाद- नांदेड ही रेल्वे १ जून तर १५ जुन दरम्यान रद्द करण्यात आली. तसेच नांदेड – आदिलाबाद ही रेल्वे १ जून ते १५ जून तर सिकंदराबाद- श्री साईनगर शिर्डी ही रेल्वे ४ जून ते १३ जून दरम्यान रद्द करण्यात आली.

याशिवाय श्रीसाई नगर शिर्डी ते सिकंदराबाद ही रेल्वे ५ जून ते १४ जुन या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद-रेणीगुंठा ही रेल्वे ४ जून ते ११ जून दरम्यान रद्द करण्यात आली. याशिवाय रेणीगुंठा-औरंगाबाद ही रेल्वे ५ ते १२ जून या दिवशी रद्द करण्यात आली आहे. तसेच परभणी- नांदेड ही रेल्वे ३ ते १७ जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड -तांदूर  ही रेल्वे १ जून ते १५ जून दरम्यान सिकंदराबाद ते तांदूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच तांदूर-परभणी ही रेल्वे २ जून ते १६ जून दरम्यान तांदूर ते सिकंदराबाद आणि नांदेड ते परभणी दरम्यान रद्द करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!