औरंंगाबाद : जालना रोडवरील अमरप्रित चौक आणि आकाशवाणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० ते १६ जुलै दरम्यान वाहतूक व्यवस्थेत अंशतः बदल करण्यात आले असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जालना रोडवरील अमरप्रित चौक आणि आकाशवाणी चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसापासून दिसून येत आहे. जालना रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० ते १६ जुलैदरम्यान अमरप्रित चौक आणि आकाशवाणी चौकातील सिग्नल सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद राहणार आहेत.
अमरप्रित चौकातून शहानुरमियॉ दर्गाहकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोंढा नाका उड्डाणपुलाखालून वळण घेवून यावे लागणार आहे. तर आकाशवाणी चौकातून जवाहरनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना सेव्हनहिल उड्डाणपुलाखालून वळण घेवून यावे लागणार असल्याचे सहाय्यक आयुक्त वानखेडे यांनी कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार : सूर्यकुमार यादव
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- सूर्यकुमार यादववर नाराज डेव्हिड वॉर्नर ; ट्विट करत म्हणला, ‘मला विश्वास बसत नाहीये’
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
