🕒 1 min read
बीड : २००८ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळीत राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी बीड येथील परळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले असून जामीन मिळूनही दिलेल्या तारखांना हजर न राहिल्याबद्दल अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
२२ ऑक्टोबर २००८ रोजी मुंबईमध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. तद्पश्चात या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. तसेच राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी बीडमधील अंबाजोगाई येथे एसटी बसची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा कलम 143 427 336 109 भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, त्यानंतर राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला. परंतु, जामीन मिळूनही दिलेल्या तारखांना हजर न राहिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एम.एम.मोरे-पावडे यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “पत्रकारांवर खटले दाखल करून, त्यांना अटक करणाऱ्या सूडबुद्धी ठाकरे सरकारचे डोके ठिकाणावर येवो”
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण
- भाजप नेते राम सातपुते कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- ‘पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’, भातखळकरांची मागणी
- ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून जांभेकरांनी राष्ट्रभक्ती व समाजसेवेचे बीज महाराष्ट्रात रुजवले- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
