🕒 1 min read
मुंबई:- जातिनिहाय जनगणनेबाबत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याचा विधानामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२१ ची जनगणना जातिनिहाय व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.
पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांनाही हात घालायला सुरुवात केली आहे. पंकजा यांनी आता थेट ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी भाजपचे नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्विट करून मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून दिली आहे.
आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत हे ट्विट केलं आहे. पंकजा यांनी पोस्टसोबत एक व्हिडीओही अपलोड केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे लोकसभेतील गोपीनाथ मुंडे यांचं 18 मिनिटाचं भाषण आहे. त्यात त्यांनी लोकसभेतील उपनेते म्हणून ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर भाजपची सत्ता आली पण अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. आज खुद्द पंकजा मुंडेंनी हिंदीत ट्विट करत थेट दिल्लीला ओबीसींच्या जनगननेची आठवून करून दिलीय.
हम भी इस देश के है हमारी भी गिनती करो .. ओबीसी जनगणना की आवश्यकता और अपरिहार्यता है ..कुछ यादे और कुछ वादे https://t.co/2yQi1fBgw0
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 24, 2021
महत्वाच्या बातम्या
- एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार
- ‘आरसीबी’तून आऊट ‘सीएसके’त इन? उमेश यादवच्या ‘या’ कृतीने चर्चेला उधाण
- राममंदिर निधीसाठी घरोघरी फिरलेच पाहिजे-आमदार सावे यांचा इच्छुक उमेदवारांना सल्ला
- रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेने तातडीने माफी मागावी; राम कदम आक्रमक
- ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांना संपवले’ साक्षी महाराजांचे कॉंग्रेसवर गंभीर आरोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
