Share

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार पक्षाकडून दिला जाईल – अजित पवार

Published On: 

सोलापूर – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके  किंवा भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे.

दरम्यान,या पार्श्वभूमीवर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची बैठक रविवारी (दि. 21) आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, दीपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील, ‘विठ्ठल’चे चेअरमन भगीरथ भालके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, तुमच्या मनातीलच उमेदवार पक्षाकडून दिला जाईल. पक्षाने दिलेल्या उमेदवारास निवडून देण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी संघटना यांनी उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची कामगिरी केली पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!