🕒 1 min read
मुंबई: औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
या मुद्द्यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्याच सोबत खासदार उदयनराजे भोसले व इतर अनेक नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. कोश्यारी म्हणाले होते, समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. आता त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा
-
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
-
कुलदीप आणि सिराजने केली अंपायरची नक्कल ; व्हिडीओ होतोय व्हायरल
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही- सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
