Share

ओबीसींना संघटित करून अधिक सक्षम करणे हेच आपले अंतिम ध्येय-देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वसंत स्मृती मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. ओबीसी समाजाला संघटित करून अधिक सक्षम करणे हे भाजपचा अंतिम ध्येय आहे असे म्हटले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरू फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, राज्य सरकारने एम्पिरिकल डेटा मुद्दाम सादर केला नाही आणि ओबीसी समाजाची दिशाभूल केली. ओबीसी आरक्षण काढून घेणे हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे आणि त्यामागे कारण आहे. ते कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका राज्य सरकारला या निवडणुका होईपर्यंत वेळ काढायची आहे.

मराठा आरक्षणासाठी ४ महिन्यात भाजपने एम्पिरिकल डेटा गोळा केला. तसेच तो डेटा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केला. मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत देखील या प्रकरणाबद्दल फडणवीस यांनी संवाद साधला. भाजपने या राखीव जागांवरील निवडणुकीत केवळ ओबीसी समाजाला उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. मग एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण यातून माघार भाजप घेणार नाही. ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही असेही म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!