🕒 1 min read
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो वा पुढील विधानसभा निवडणूका, काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. स्वबळाच्या नाऱ्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच टोलेबाजी सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीतील तणाव वाढत असतानाच नाना पटोले यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. नाना पटोले हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘स्वबळाचा संदेश आम्ही कार्यकर्त्यांना दिला आहे. तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला असून, ते कामाला लागले आहेत. त्यामुळं आता माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ त्यामुळे नाना पटोले हे काँग्रेसच्या स्वबळावर ठाम असल्याचं पुन्हा समोर आलं आहे.
‘निवडणुकांवर डोळा ठेवून आम्ही स्वबळाचा नारा दिलेला नाही. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी असतानाच आम्ही भूमिका मांडली आहे. त्यावर ठाम आहोत. काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात दोन हात करेल,’ असं देखील देखील पटोले म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांच्या नाकावर टिच्चून होणार निवडणुका ?
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
