अहमदनगर : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर सत्तेच्या मतभेदामुळे शिवसेनेनं भाजपच्या महायुतीसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. यानंतर हे सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापनेची घाई नाही, अशी टीका भाजप नेत्यांनी अनेकदा केली.
यावर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केलं असून आमचं सरकार हे पाच वर्षे पूर्ण करणार. पाच वर्षे हे सरकार अशा पद्धतीने पूर्ण करेल की पुढील पाच वर्षे देखील पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातून भाजपचे अनेक नेते नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या रुपाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अशातच तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जीव गेला तरी बेहत्तर, पण माफी मागणार नाही – मुनव्वर राणा
- करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे सोनी टी.व्ही.आणि अमिताभ बच्चन येणार गोत्यात ?
- पंचनाम्याचे दुस-यांदा नाटक कशासाठी..? शेतकऱ्यांना सरसकट मदत करा-भाजपा
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष


