भंडारा : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकवेळा धूसफूस झाल्याचं पाहायला मिळालं. तरीही महाविकास आघाडी सरकारमधील नेते ‘आमच्यामध्ये सर्व काही छान चाललं असल्याचं वारंवार सांगत असतात. अधूनमधून एकमेकांवर कुरघोड्यादेखील करत असतात. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप म्हणजेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वादात कॉंग्रेस शांत आहे. पण आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता एक वक्तव्य केलं आहे.
कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच सहकारी मित्रपक्षाने घेतली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडीती धूसफूस आता चव्हाट्यावर आली असल्याचं पाहायला मिळत आहे.
ज्या लोकांनी ही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. आमच्यावर ईडी लागत आहे. म्हणून कॉंग्रेसला बदनाम करणारी लोक आमच्या मित्रपक्षात आहेत, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले यांनी नव्या वादाला तोंड फोडल्याचे दिसत आहे.
नाना पटोलेंनी हे सर्व सांगताना ‘मित्रपक्ष’ असा उल्लेख केला, पण राष्ट्रवादी कॉंग्रेस की शिवसेना, हे मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. त्यामुळे कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी नेमकी कोणी घेतली?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही देशाची रक्षा करण्यास असमर्थ; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
- हिंसेचा मार्ग सोडा, नक्षलवाद्यांनो विकासाच्या मुख्य प्रवाहात या- एकनाथ शिंदे
- साठ वर्षांत प्रथमच विलीनीकरणाची एसटी कामगारांकडून मागणी- अजित पवार
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा फी मिळणार परत
- गडचिरोलीत पोलिसांची दमदार कामगिरी, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा!


