उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव आणि शेजारच्या जिल्ह्यात लागलेल्या संचारबंदीचा फटका उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी महामंडळाला असला असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेत तत्पर असणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी कोरोनापुढे मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविल्याने देश लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यात लालपरीची चाकेही रूतली.
दरम्यान, अनलॉकनंतर टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. एसटी महामंडळाने देखील हळूहळू ग्रामीण भागापर्यंत आपली सेवा पूर्ववत सुरू केली. आता कुठे एसटीची सेवा सुरळीत सुरू झालेली असतानाच मागील दोन महिन्यांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे विविध क्षेत्रावर याचा परिणाम जाणवत आहे.गतवर्षी याच काळत ९ महिने लॉकडाऊन असल्यामुळे लालपरीची चाके रुतली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
मागील काही महिन्यात एसटी महामंळाला प्रवासी सेवेतून दैनंदिन ६ लाख रुपये उत्पन्न सुरू झाले आहे. कोरोना संकटापूर्वी दैनंदिन ९ लाख ५० हजाराचे उत्पन्न होते. दररोज पूर्वी २९ हजार किलोमीटर ही लालपरी धावत होती. आजघडीला ती २४ हजार किलोमीटर धावत आहे. मागील महिन्यांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे. उमरगा स्थानकातून विविध मार्गावरील बसफेऱ्या सुरू असून, दररोज सुमारे १४ हजार हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून दैनंदिन उत्पन्न ६ लाखांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महामंडळ आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंगालमध्ये भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल’ तृणमूल नेत्याची खोचक टीका
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

