Share

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज-यलो ॲलर्ट

Published On: 

मुंबई: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मुंबई विभागाच्या वेधशाळेने हि शक्यता वर्तवलेली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, आणि सातारा या भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

त्यानुसार २८ जुलै रोजी हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला यलो ॲलर्ट दिला आहे. तर, २९ जुलै रोजी ठाणे, रायगड, सिंधुदर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या भागात मुसळधार पावसाने अगोदरच धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी दरड दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले आहेत. आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवल्याने या जिल्ह्यांच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे कळते. याबाबत हवामानाची अधिक माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी समाज माध्यमावर दिली आहे.

एकीकडे पश्चिम महाराष्ट्रावर पावसाचे अवकाळी संकट आहे. तर मराठवाड्यात अजूनही जेमतेम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!