🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. विधिमंडळात विरोधी पक्ष बाकावर बसलेल्या भाजपा नेत्यांनी विविध मुद्द्यावरुन विधिमंडळात गदारोळ घातला. आजच्या तीसऱ्या दिवशीही विरोध विविध मुद्द्यांवरुन आक्रमक झाले आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. सत्ता गेल्यानं आलेला हताशपणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले प्रतिक्रिया देताना म्हणाले, विधानसभा अध्यक्षपद मजबूत आणि अनुभवी माणसाला मिळालं पाहिजे, असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. हायकमांड काय निर्णय घेईल हे पाहावं लागेल. भाजपनं त्यांच्या काळात राज्यात अधिवेशन कसं चालवलंय हे जनतेनं पाहिलं आहे. नरेंद्र मोदी संसद कशी चालवतात हे देशानं पाहिलं आहे. विरोधकांनी काल आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
सत्ता गेल्यानं आलेला हताशपाणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नोकरभरती घोटाळ्यामध्ये पटवारी, कृषी सहाय्यक भरती घोटाळा सुरु झाला होता. सुखदेव डेरेला क्लिन चिट देण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस क्लीन चीट द्यायचे, ते न्यायधीश असल्यासारखं वागायचे, असेही नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “हे सरकार आपसात पायात पाय गुतून पडेल…”, रावसाहेब दानवेंचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकारण
- “लाखो युवकांच वाटोळं करायचा विक्रम ठाकरे-पवार सरकारच्या नावावर काळ्या कोळशाने लिहला जाईल”
- “…यावरून राज्यकारभाराचा काय बट्ट्याबोळ झाला आहे याची कल्पना यावी”
- “महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे हे त्या आमदाराच्या वक्तव्यातून दिसलं”
- ‘…आता तरी सत्तेत बसलेल्या बलात्काऱ्यांवर कारवाई व्हावी’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
