जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी चार दशकांचा भाजपसोबत असलेला संसार मोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना महत्वाचं मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सद्या फक्त राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळणार यावर जवळजवळ निश्चिती असतानाच आता भाजप आणि खडसेंमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाल्याचं दिसून येत आहे.
आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली.
यावर, माजी मंत्री व भाजप आमदार गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील”, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे. महाजन म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील” असा टोला त्यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेशानंतर खडसेंचा भाजपला अजून एक धक्का
आज जळगावात भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- मथुरेतील नंदबाबा मंदिरात परवानगी न घेता नमाज पठण ; फोटो व्हायरल
- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आहे का ? टोपे म्हणाले…
- आता भाजपला दाखवतो नाथाभाऊ कोण आहे !
- ‘मद्यपी चालकाने माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी का ? चंद्रपूरच्या चिमुरडीचे मुख्यमंत्र्यांना पत्र’
- राज्यपाल नियुक्त १२ आमदारांशी आमचा काहीच संबंध नाही; गिरीश महाजनांनी केलं स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

