मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांना लक्ष्य केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची अवस्था पाहून दया येत असल्याचं म्हटलं. त्यानंरत इंदिराबाईंच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेसोबत काँग्रेस ची झाली फरफट, असं म्हणत शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले.
विधानसभेत राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आहेत. तर विधानपरिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे हे विरोधीपक्ष नेते आहेत. यामध्ये काँग्रेसला काहीही मिळालं नाही. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. इकडे (विधानसभेत) अजित पवार वरती (विधानपरिषदेत) अंबादास दानवे, विचारला का तुम्हाला, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरातला केला. तुम्ही जाहीरपणे बाहेर बोलले की निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. इंदिराबाईंच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेसोबत आता झाली नुसती फरफट, असं म्हणत शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिवसेनेचा टोमणे सेना असा उल्लेख केला.
महत्वाच्या बातम्या :
- Manisha Kayande | “8 वेळा दिल्लीच्या वाऱ्या केल्या…”, एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचा हल्लाबोल
- Maharashtra Assembly | औरंगाबाद, उस्मानाबाद शहरासह नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर
- Assembly Session 2022 | भाई जगताप सभागृहात कडाडले, दादा भुसे यांचे प्रत्युत्तर
- Nitesh Rane | “चपट्या पायांचे उद्धव ठाकरे यांच्यामुळे…”, नितेश राणे यांची बोचरी टीका
- Assembly Session 2022 | आदित्य ठाकरेंच्या एका वाक्यावर प्रचंड गदारोळ ; मुनगंटीवार-जयंत पाटीलही भिडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

