Share

Manisha Kayande | “8 वेळा दिल्लीच्या वाऱ्या केल्या…”, एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे. अशातच काल सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की देखील झाली असल्याचं पाहायला मिळालं. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक वारंवार एकमेकांवर टीका करत असताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

मनिषा कायंदे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोलः

आठ वेळा दिल्लीच्या वाऱ्या केल्यावर तुम्हाला काय मिळालं असा सवाल मनिषा यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीचं दिल्लीचं कार्यालय केवळ ग्राउंड फ्लोअर होतं मात्र ते आता किती मजली झाले, असं आम्ही ऐकतो की 600 कोटींचं कार्यालय बांधलेलं आहे. तिकडे ते जाऊ शकतात, तरी देखील अशी काहीतरी मंत्रीपद त्यांना मिळाली आहे.  मग सांगा की मातोश्रीवर एकदा गेल्यावर तुम्हाला काय मिळालं आणि आठ वेळा दिल्लीच्या वाऱ्या केल्यावर तुम्हाला काय मिळालं, असा सवाल मनीषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.

पाहा व्हिडीओः

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. बंडखोरपणा करुन सत्ता प्राप्त करणाऱ्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा केला गेला आहे. एवढंच नाही तर सत्तेत आल्यानंतर शिंदे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरुन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धारेवर धरत आहेत.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!