Share

त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेत आता मुश्रिफांनी राजीनामा द्यावा- किरीट सोमय्या

Published On: 

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केलं असून अनेक नेते, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्या करत आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना सळो की पळो करुन ठेवलं आहे. त्यातच आता सोमय्यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

‘कोरोना काळात ठाकरे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरुच होता. सामान्य जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ जनतेला लुटत होते. मंत्रालय 100 टक्के बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी रुपये लुटत होते’, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी मुश्रीफांवर केलाय. त्याचबरोबर हा घोटाळा सिद्ध झाला असून, मुश्रीफांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.

इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिलेलं 1 हजार 500 कोटीचं कंत्राट अखेर रद्द करण्यात आल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. 27 हजार ग्रामपंचायतींचा TDS रिटर्न भरण्यासाठी पुढील 10 वर्षासाठी हे कंत्राट दिलं गेलं होतं. 8 महिन्यांपूर्वी मुश्रीफांचे जावई मतीन यांनी ही कंपनी विकत घेतली, असं सोमय्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जयोस्तुते कंपनीचा मागच्या 8 वर्षात एक रुपायाचंही आवक-जावक नाही. याचा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे. याबाबत तक्रार करायला जातानाच मला अडवण्यात आलं होतं. ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!