सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयार करीत आहे. शिवसेना देखील आपली टाकत या निवडणुकीत वाढविताना पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये आघाडीमधील नेते फोडण्यात स्पर्धा सुरु झाली असून आता युतीमध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेकडे विधानसभेच्या जितक्या जागा आहेत तितक्याच जागा राहतील, युती झाल्यास शिवसेनेची एकही जागा भाजपला सोडणार नसल्याचे जलसंधारणमंत्री तथा सोलापूरचे सहपालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त आलेले ना. सावंत यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना सावंत म्हणाले,आम्ही जिल्ह्याचा अहवाल पक्षप्रमुखांना दिला आहे. शिवसेनेने दिलेल्या लढ्याचे योगदान वाया जाऊ दिले जाणार नाही. कोणाला जागा सुटेल आणि कोणाची जागा जाणार याच्या नादाला लागू नका. गल्ली व गाव तिथे शाखा काढा. शिवसैनिकाच्या निष्ठा आणि कामावर माझा विश्वास आहे. आपल्यालाच गुलाल उधळायचा आहे. येत्या पंधरा दिवसांत युती होईल की नाही हे जाहीर होईल, असेही डॉ. सावंत म्हणाले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दिलीप सोपल, रश्मी बागल, दिलीप माने यांच्यासह अनेक नेते मंडळी सेनेत दाखल झाले आहेत. या इनकमिंगमुळे सेनेची ताकत वाढली असली तरीही एक गट नाराज झाल्याची देखील चर्चा आहे. विशेषतः रश्मी बागल यांचा शिवसेना प्रवेश अनेकांना रुचलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
‘३७० हटविले, तसे आरक्षणही हटवतील’, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती
रावसाहेब दानवेंच्या ‘प्रेत यात्रे’च्या टीकेला धनंजय मुंडेंचे जश्यास तसे उत्तर, म्हणाले…


