नवी दिल्ली- दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे . गेल्या 24 तासांत राजधानीमध्ये 28 हजार 395 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत 277 लोकांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखणे हे केजरीवाल यांच्यासमोर मोठे आव्हान बनले असून . अरविंद केजरीवाल राजधानीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या अभावाविषयी सातत्याने बोलत आहेत. ते सतत केंद्र सरकारकडून मदतीसाठी आवाहन करत आहेत.
Serious oxygen crisis persists in Delhi. I again urge centre to urgently provide oxygen to Delhi. Some hospitals are left with just a few hours of oxygen.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 20, 2021
वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. यातच मंगळवारी सीएम केजरीवाल यांनी ट्विट केले होते की दिल्लीत काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन बाकी आहे. केजरीवाल यांच्या या ट्विटनंतर देशाच्या राजधानीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
No vision, no direction. Delhi is dying. If you have any SHAME, then RESIGN @ArvindKejriwal
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 21, 2021
यानंतर आज पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी सीएम केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘व्हिजन नाही, दिशा नाही. दिल्ली मरत आहे. तुम्हाला लाज वाटत असेल तर राजीनामा द्या. ‘असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भोरमधील तीनशे वर्षांची परंपरा खंडीत, श्रीराम जन्मोत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द
- राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा, काँग्रेसच्या आमदाराचे मोदींना पत्र
- महाराष्ट्र शोकमग्न आहे! मृत रुग्णांच्या नातेवाईकांचे अश्रू कसे पुसू ? – मुख्यमंत्री
- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आज पासून ‘या’ जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यु’
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर करा – रयत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

