बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा सुरु आहे. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडमध्ये हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे.
कोरोना होता म्हणून यात्रा थांबविली होती. आता कोरोना थोडाफार संपुष्टात आल्यावर यात्रा सुरू झाल्या. परळीत आल्यावर कोरोना संपुष्टात आल्याचे वाटले. माझ्या लग्नाची वरात निघाली नाही, मात्र परळीत वरात पाहिली. असंख्य तरुण धनंजय मुंडेवर प्रेम करतात हे मी आज परळीत पाहिले. हार घालण्याची पद्धत वेगळी होती, बघेल तिथं क्रेनने हार घातले. लोकांचे प्रेम पाहून दहा निवडणुकादेखील मुंडे यांची कोणी थांबवू शकत नाही. परळी फार पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण जोर इथल्या नेत्यात आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम मुंडे भविष्यकाळात करतील. एक विधानसभेची निवडणूक झाली म्हणजे काही नाही, जवळचे लोक दूर गेले की सर्व संपते, धनंजय मुंडेंवर नवी जबाबदारी मिळाली, मला अध्यक्षपदाची धुरा दिली त्यावेळी अनेकांनी पक्ष बदलला होता, मात्र दोन वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती बदलली आहे, असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह 4 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या
- आरएसएसबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून जावेद अख्तरांना न्यायालयाचा दणका
- किरीट सोमय्यांचा कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडली नोटीस
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- पहिला प्रयत्न वाया, आता अकरा कोळसा खाणींच्या लिलावासाठी आता दुसऱ्या प्रयत्नाची प्रक्रिया सुरु
- करुणा शर्मा प्रकरणावरून पंकजांची धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका; ‘एट्रॉसिटी हा दलितांसाठी कवच कुंडल, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

