टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता यापुढे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची गरज असणार नाही अस गडकरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे कमी शिकलेल्या वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे.
नवी मुंबई येथे बोलताना गडकरी यांनी सुशिक्षित वाहन चालकांपेक्षा कमी शिकलेले वाहन चालकही चांगले वाहन चालवितात. म्हणूनच वाहन चालकाच्या परवान्यातून शिक्षणाची अट काढण्यात आली आहे. त्याचा फायदा दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या नागरिकांना होणार असून देशात कमतरता असलेल्या २५ लाख चालकांची उणीव भरून निघणार आहे अस विधान केले आहे.
दरम्यान, पुढे बोलताना गडकरी यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या धरतीवर मुंबई-दिल्ली हा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. मात्र हा मार्ग इलेक्ट्रीक असणार आहे. त्यामुळे इंधनामध्ये मोठी बचत होणार असून हे अंतर बारा तासांमध्ये वाहनांना पार करता येणार आहे अस विधान केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

