मुंबई: विरोधकांना कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज ठणकावून सांगितले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला.
नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे-नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“अजित पवारांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही…”, फडणवीसांचा टोला
‘उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या सरकारवर कंट्रोल नाही’ – किरीट सोमय्या
“दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु”, फडणवीसांचा दावा
‘नोटिसा पाठवून इलेक्शन फंड जमा करतात’; मनसे आमदार राजू पाटलांचा डोंबिवली महापालिकेवर आरोप
“विराट कोहली कर्णधार असताना…”; भारताच्या दिग्गज माजी फलंदाजाचे मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

