🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दाऊद इब्राहीमच्या नातेवाईकांबरोबर केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावरूनच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून संपूर्ण ठाकरे सरकार मलिकांच्या पाठीशी उभे ठाकले आहे. ज्यांनी दाऊदला सहकार्य केले त्याला वाचवायला सरकार उभे राहिले आहे. देशात असे कधीच झाले नाही की, पोलीस कस्टडी मध्ये असतानादेखील मंत्रीपदावर व्यक्ती कायम आहे. एकप्रकारे राज्यघटनेचा अवमान हे सरकर करत आहे.” असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, ते सरकार मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्या पाठींशी उभे आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी कायम धरणार आहे. त्यामुळे भाजप ठामपणे राजीनामा झाला पाहिजे, यासाठी सभागृहात संघर्ष करेल. असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘त्या’ प्रकरणी मोदी सरकारविरोधात विधानसभेत निंदा प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंचा इशारा
-
“प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”; आर्यन खान प्रकरणावर संजय राऊत आक्रमक!
-
मोठी बातमी! आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही; चौकशीत उघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
