Share

‘ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको’ – विजय वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: वार्ड संरचना किंवा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारचे होते. नंतर ती जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यात आली. आता आम्ही ओबीसी संदर्भात कायदा करून ते अधिकार पुन्हा राज्य सरकारकडे घेण्याच्या निर्णय करत आहे. असा कायदा झाल्यास वार्ड संरचना करणे, निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे हे अधिकार राज्य सरकारला मिळतील, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते.

सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटने आधीच त्याला मान्यता दिलेली आहे. विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर कायदा लगेच अमलात येऊ शकेल. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ही विश्वासात घेऊ. आधी ही त्यांच्यासोबत ओबीसी आरक्षण संदर्भात त्यांचे सहकार्य घेतले आहे. यासंदर्भात ही आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असंही वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!