Share

‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली होती. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

कोरोनाने नागरिकांचे आर्थिक चक्र बिघडले असतानाच पुरामुळे संसाराचा कणाच मोडून पडला आहे. अनेकांचा संसार, जनावरे वाहून गेली आहेत. यामुळे पुरग्रस्तांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत असून राज्य सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कारभावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.

‘केंद्र सरकार मदत जाहीर करणार तोपर्यंत महाराष्ट्र सरकार वाट बघणार. १० हजाराची तातडीची मदत वडेट्टीवारांनी जाहीर केली होती ती अधिकाऱ्यांना माहितीच नाही. ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे, इतकं खोटं बोलणार आणि नालायक सरकार जगाच्या नकाशावर नसेल. एक दमडी दिली नाही पूरग्रस्तांना,’ असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!