Share

‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे सांगत विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणांवर भाष्य केलं होतं. ‘महिलांवर अत्याचार व्हावा असं कोणत्याच सरकारला वाटत नसतं. रावणालाही तसं वाटत नसेल. म्हणूनच रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेले तेव्हा तिच्यावर अत्याचार केला नाही. तिला सन्मानपूर्वक अशोक वनात ठेवले,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांच्या या विधानाचा भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘ज्या डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, सातत्याने अनेक वर्षापासून छळतोय, तिला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही त्या माणसाने महिला सन्मानच्या गोष्टी करु नये,’ असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं असून संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!