सिंधुदुर्ग : नव्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशाच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलने केली आहेत. त्यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
लडाख आणि काश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती.
या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ह्या भिकार माणसाला खासदार कोणी केला?? कुठला संबंध कुठे जोडायचा काही अक्कल आहे की नाही. Investigative agencies चं काम काय आणि army चं काय हे ज्या खासदाराला कळत नाही त्याला देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहात जायचा अधिकारचं नाही.’ अशी जळजळीत टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
ह्या भिकर माणसाला खासदार कोणी केला?? कुठला संबंध कुठे जोडायचा काही अक्कल आहे की नाही. Investigative agencies चं काम काय आणि army चं काय हे ज्या खासदाराला कळत नाही त्याला देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहात जायचा अधिकारचं नाही. https://t.co/iCYGuo3X17
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 30, 2020
ईडी, सीबीआय आदी तपास संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी – संजय राऊत
हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही. असा टोला शिवसेनेने सामना संपादकीयमधून लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘डुक्कर सत्तार अब्दुल, तुझ्यासारखे आमची गाडी धुतात’ ; निलेश राणेंची शेलक्या शब्दांत टीका
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

